June 13, 2026

मीडिया कव्हरेजमध्ये सत्यता, निष्पक्षता आणि जबाबदारीचे महत्त्व: डॉ. जयदेव डोळे

www.themaharashtratoday.com

 प्रतिनिधी : अशोक अधाने

मोबाईल नं. 9623871987

दि. 13 डिसेंबर 2025

छ. संभाजीनगर: आजच्या डिजिटल युगात, माहितीचा प्रसार अभूतपूर्व वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत, माध्यमांनी (Media) आपली भूमिका बजावताना ‘माध्यम नीतिमत्ता’ (Media Ethics) किंवा ‘पत्रकारितेचे नैतिक नियम’ पाळणे अत्यंत आवश्यक बनले आहे. माध्यमांचे कार्य केवळ बातम्या देणे नाही, तर सत्यता (Accuracy), निष्पक्षता (Impartiality), आणि सामाजिक जबाबदारी (Social Responsibility) जपण्याचे देखील आहे, असे प्रतिपादन पडेगाव येथील सिद्धार्थ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स कॉलेज मध्ये आयोजित केलेल्या “जनसंवाद आणि पत्रकारिता ” विद्यार्थी संवादात बोलताना डॉ. जयदेव डोळे यांनी केले.

माध्यम नीतिमत्ता म्हणजे काय? हे सांगत असताना डॉ. डोळे यांनी
माध्यम नीतिमत्ता म्हणजे पत्रकार आणि माध्यम संस्थांनी त्यांचे काम करत असताना पाळायचे नैतिक आणि व्यावसायिक नियम सांगितले यात मुख्यत: खालील गोष्टींचा समावेश होतो:
सत्य आणि अचूक माहिती देणे. चुकीची, दिशाभूल करणारी किंवा अर्धसत्य माहिती देणे टाळणे. बातमी प्रकाशित करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे (Fact-checking) महत्त्वाचे आहे.
बातमी मध्ये निष्पक्षता आणि समतोल राखणे गरजेचे आहे. राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक हितसंबंधांपासून दूर राहून सर्व पक्षांना समान संधी देणे आणि संतुलित दृष्टिकोन मांडणे.
गोपनीयतेचा आदर राखणे. व्यक्तींच्या खासगी जीवनाचा अनादर होईल अशा बातम्या टाळणे.
संवेदनशीलतेचे भान ठेवणे: दंगली, नैसर्गिक आपत्ती, आत्महत्या किंवा लैंगिक शोषणासारख्या संवेदनशील विषयांवर वृत्त देताना पीडितांच्या भावना आणि प्रतिष्ठेचा आदर करणे.
उत्तरदायित्व (Accountability): चुकीची बातमी दिल्यास ती त्वरित दुरुस्त करण्याची तयारी ठेवणे आणि आपल्या कृतीची जबाबदारी घेणे.
नीतिमत्तेचे पालन करणे यासाठी गरजेचे आहे कारण माध्यम हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानले जाते. जर माध्यम नीतिमत्तेपासून दूर गेले, तर त्याचा थेट परिणाम समाजाच्या विश्वासार्हातेवर (Trust) आणि शांततेवर होतो. त्यामुळे पत्रकार आणि माध्यम संस्थांनी अंतर्गत धोरणे अधिक कठोर करावी लागतील. बातमीदारांसाठी नियमित नैतिक प्रशिक्षण, तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करणे आणि ‘संपादकीय स्वातंत्र्य’ (Editorial Independence) अबाधित ठेवणे, ही आजची गरज आहे, असे डॉ. डोळे म्हणाले.

यावेळी प्राचार्य मनोहर वानखेडे यांनी डॉ. डोळे यांचे स्वागत केले तर प्रा. पूजा गिरी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

You may have missed