गदाना
दि. ११ मे २०२४
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकास हा खूप मागे राहिलेला आहे तो स्थानिक राजकारण्यांनी तो थांबवून ठेवलेला आहे. जिल्यात विकास करण्यासाठी पाणी,वीज,शिक्षण,आरोग्य,शेतकऱ्यांचा रखडलेला पीकविमा, शेतकऱ्यांना वाजवी दरात बियाणे-खते-फवारणी यंत्र व शेतीपूरक यंत्रसामुग्री, मोफत स्पर्धापरीक्षा केंद्र, वृद्धांसाठी प्रत्तेक गावात निवारा केंद्र, महिलांसाठी सक्षमीकरण केंद्र, कचरा व्यवस्थापन असे बरेच कामे येथील राजकारणी लोकांना दिसत नाही तर फक्त जातीयवाद करून “हिंदू खतरे में है” करत लोकांची दिशाभूल करत धूळफेक करत आहे.
मागील कार्यकाळामध्ये आपण पहिले असेल कि माझ्याकडे कुठलीही सत्ता नसतांना देखील मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पीकविमा मिळावा म्हणून कार्य केले आहे ते आपण समजून घेणे गरजेचे आहे. मी आमदार असतांना एखादे काम हाती घेतले तर पूर्ण करण्यासाठी माझा आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरीही मी मागे हटलो नाही.
लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खुलताबाद तालुक्यातील काटशेवरीफाटा येथे नागरिकांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली यावेळी उपस्थित किरण निकम, सोमीनाथ जाधव, गोळेगाव येथील नंदू चव्हाण, बाळू शेळके,शिवाजी चौधरी,अक्षय साळुंके व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन