July 26, 2026

खुलताबाद तालुक्यात अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकमालाचे नुकसान

खुलताबाद

दि.१० मे २०२४

शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी हंगामातील पिकांची कामे सध्या जलदगतीने करणे सुरु आहे त्यातच काल अचानक  झालेल्या पावसाने शेत मालांचे नुकसान झाले त्यामध्ये काही ठिकाणी बाजरी तर काही ठिकाणी हरबरा, कांदा व ईतर रब्बी हंगामातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याचे दिसून आले. रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या पिकांना सध्या कापणी करून जमा करणे तसेच जमा झालेले पिक मळणी यंत्राद्वारे काढण्याचे काम सुरु आहे त्यातच काही ठिकाणी मळणी यंत्र वेळेवर उपलब्ध होत नाही तर काही ठिकाणी ते थेट शेतापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही त्यातच पावसाचे ढग दिसू लागल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे.

१० मे रोजी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे परंतु सध्या सुरु असलेल्या खासदारकीच्या निवडणुकीमुळे अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे शेतकर्यांकडे प्रशासनाने काना डोळा केलेला दिसतोय असा सूर शेतकरी वर्गाकडून ऐकावयास मिळतोय.

www.themaharashtratoday.com

 

You may have missed